क्राईम न्यूजब्रेकिंगमहाराष्ट्र
गृहमंत्र्याची घोषणा: साडेबारा हजार पोलिसांची भरती

मुंबई : कोरोना महामारीमुळे राज्यातील पोलीस भरती प्रक्रीया ठप्प पडली होती. दोन टप्प्यात पोलीस भरती घेण्यात येणार असून, १२ हजार ५० पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० पोलिसांची भरती होणार आहे. दुस-या टप्प्यात उर्वरीत पदाची भरती घेण्यात येणार असल्याची घोषणा आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.